आता माझ्या शब्दात,
मला मीच सापडत नाही.
तिचे काय सांगू,
आता मला मीच आवडत नाही.
हस्तो कधी कधी मी,
अश्रू काय हे जाणण्यासाठी,
शब्द अडतात ओठांवारी,
फक्त माझ्या पापण्यांसाठी.
कस सांगू शब्दच नाही,
माझ मन ही जळत असत.
कोरड्या पापण्या असतात,
पान मात्र गळत असत.
माझ्या भावनांचा वार,
सदा त्या पानांवर होत असतो,
जसा जीवनाचा सत्कार ,
त्या चितेवरी होत असतो.
तू तुझीच राहा आता,
मी माझा किनारा हरवलाय.
जगण्याचा भास माझ्यात,
तू दिलेल्या मृत्यूनेच जागवलाय.
No comments:
Post a Comment