Saturday, March 19, 2011

प्रेमात पडले कि

प्रेमात पडले कि सारेच जन कविता करायला लागतात
खर सांगायचं तर थोडेसे वेड्या सारखेच वागतात

यात काही चुकीचे नाही , साहजिकच असत सारे
एकदा प्रेमात पडले कि उघडू लागतात मनाची दारे ..

मनातल्या भावना अलगद पण कागदावरती उठतात
डोळ्यांतली आसवे सुद्धा शब्द होऊनी पसरतात ..

रात्रन -रात्र दिवस फक्त तिचे विचार मनात घोळू लागतात
नेमक्या विसरायच्या गोष्टी मात्र तेव्हाच आठवू लागतात ..

डोळ्याला डोळा लागत नाही ,रात्र एकाकी खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द कवितेतून बाहेर फुटू लागतात ..

गोड गोड स्वप्न पाहुनी रात्र - रात्र जागत राहतात
तिच्या संमती शिवाय सगळ काही ,तेव्हाच ठरवून जातात ..

निरस अशा एकांत ठिकाणी, फक्त तिच्यामुळेच बसू लागतात
कितीही पाय दुखत असले तरी ते आपोआप तिच्यामागे वळतात ..

इकडचे तिकडचे शब्द कोठून कसे तरी एकत्र आणतात
पण प्रेमात पडल्यावर तुटकी फुटकी का होऊ नये
सारेच जन कविता करायला लागतात ..

चांगलेच ठाऊक आहे ती आपल्याला मिळणार नाही
तरी पण उगाचच मनाशी हट्ट करतात ..

एकेरी ,दुहेरी का चारोळी का होईना
पण हे मात्र खरे आहे ...,


प्रेमात पडले कि सारेच जन कविता करायला लागतात
प्रेमात पडले कि सारेच जन कविता करायला लागतात

--

No comments:

Post a Comment