कितीही वेळा तू भेटलीस,
तरी मनी एक आस असायची,
शेजारी माज्या बसलीस की
अंगात एक विज कडकडायाची.
मी भेटायला येणार म्हणुन,
नट्टापट्टा तू तासभर करायचीस,
भेटल्यावर कौतुक नाही केल म्हणुन,
किती हक्काने भांडायाचिस.
भेटायला तू येणार म्हणुन,
बघता बघता तिन वर्ष लोटले,
तुझ्यासाठी जपलेले शब्द,
मनातल्या मनातच दाटले.
दिलासा देण्यासाठी तरी,
तू पुन्हा एकदा भेटणार ना?
नाही करणार तक्रार कधीही,
मग तर सोडून नाही जाणार ना?
स्पर्शाच्या त्या तुज्या भाषेला,
पुन्हा एकदा तरी अनुभवयचय,
माज्याशी हक्काने भांडताना,
पुन्हा एकदा तरी बघायचय.
hiiiii
ReplyDelete